डीसी गुरुबक्षानी कंपनीवर होणार कार्यवाही? तक्रारदारांसोबत अरुण निंबाळकर यांनी केलेल्या आर्थिक व्यवहार येणार समोर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बांधकाम विभाग झालें जागे *3 जानेवारीला होणार प्रत्यक्ष चौकशी तक्रारदार सर्व पुराव्याणीशी आणि सोबत टेक्निकलं इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर आणि विविध पत्रकार समवेत होणार प्रत्यक्ष दाखल.#NHR - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



डीसी गुरुबक्षानी कंपनीवर होणार कार्यवाही? तक्रारदारांसोबत अरुण निंबाळकर यांनी केलेल्या आर्थिक व्यवहार येणार समोर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बांधकाम विभाग झालें जागे *3 जानेवारीला होणार प्रत्यक्ष चौकशी तक्रारदार सर्व पुराव्याणीशी आणि सोबत टेक्निकलं इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर आणि विविध पत्रकार समवेत होणार प्रत्यक्ष दाखल.#NHR

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राष्ट्रीय महामार्ग मूल ते गडचिरोली महामार्ग क्र. 930 तसेच गोंडपिपरी ते विठ्ठलवाडा आणि सिंदेवाही ते नागभीड या रस्ता बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार संबधी चौकशी करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ता आणि ताई फॉउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा कु. गोमती पाचभाई यांनी पुढाकार घेतला आहे.

1 डिसेंबर रोजी त्यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या नवीन वर्षाच्या सुरवातीला 3 जानेवारीला मूल ते गडचिरोली रोडची चौकशीसाठी तक्रारकर्त्या कु. गोमाती पाचभाई यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी वेळी स्वतः उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे.

त्यामुळे डी. सी. गुरुबक्षानी कंपनीच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखाळून गेलेला आहे. भेगा दिसल्या नाही पाहिजे म्हणून भेंगामध्ये सिमेंट मसाला भरून ते बुजविण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी डांबर वापरण्यात आलेलं आहे तर सावली शहराच्या पुढे सिमेंट रस्ता पूर्णपणे उखळून गेलेला आहे. त्याच ठिकाणी मागच्या महिन्यात अपघात होऊन 1 मृत्यू आणि एकजण जखमी झालेलं होत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागा याकडे पूर्णपणे डोळेझाक करीत आहे.

या महामार्गांवर आज पर्यंत अनेक तक्रारी झाल्या परंतु एकाही तक्रारीवर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तक्रारदारांना मॅनेज करण्यात तरबेज असणारा मास्टर माईंड अरुण निंबाळकर यांनी अनेक तक्रारदारांना आपल्या चाणक्य नितीच्या जोरावर मॅनेज केले आहे. तसे पुरावे सुद्धा टीम खबरकट्टा च्या हाती लागले आहेत.

अनेक तक्रारदारांची यादी सुद्धा माहितीच्या अधिकारात प्राप्त केली आहे. रस्त्याचे बांधकाम हे अनेक ठिकाणी सावली, आणि गडचिरोली शहरासह इस्टीमेट नुसार काम झालेल नाही. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे मुरूमचा वापर करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी रस्ता खोदकामात निघालेला मलमा सरसकट पसरविण्यात आलेला आहे. त्याचे सर्व पुरावे तक्रारदार यांच्याकडे आहेत.

ताई फॉउंडेशन च्या माध्यमातून 2017 ते 2022 पर्यंत केलेल्या सर्वेनुसार रस्ते अपघातात 60% अपघात हे डी. सी गुरुब क्षानी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालें हे सर्वेअंति समोर आले. रस्त्यावर मुरूमचे ढग टाकून असताना त्याठिकाणी कोणतीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे रात्रीच्या वेळेला मुरूमाच्या ढीगाऱ्यावर गाडीचा अपघात होऊन 10 जणांचा बळी गेलेला आहे. आणि इतर काही जणांचा बळी कंपनीच्या हायावा ट्रक ने गेला आहे. या सर्व मृतकांना भरपाई आणि डी. सी गुरुबक्षानी कंपनी आणि कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका ताई फॉउंडेशन च्या माध्यमातून लवकरच उच्च न्यायालयात टाकण्यात येणार आहे. 3 तारखेच्या चौकशी वेळी पत्रकार संघटनाना उपस्थित राहण्याची विनंती कु. गोमती पाचभाई यांनी केली आहे.

डी. सी. गुरुबंक्षनी कंपनी ही रस्त्याचे अतिशय निष्कृष्ठ दर्जाचे काम केलेले असून स्वतः पाहणीत अनेक गांभीर्य लक्षात आलेले आहेत. 3 तारखेला अधिकाऱ्यांना सुद्धा घाम फुटेल आणि कंपनीची सिक्युरिटी डिपॉजिट जप्त होईल. आणि रस्त्याचे झालेलं खराब काम पूर्णपणे दुरुस्त होईल त्यामुळे अपघात होणार नाही. तसेच कंपनीचे सुपरव्हायजर अरुण निंबाळकर यांची एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे. त्यांच्याविषयी अनेक पुरावे टीम खबरकट्टा कडे आहेत. राजकीय, सामाजिक नेत्यांना मॅनेज करून त्यांनी मोठ्याप्रमाणात आर्थिक माया जमविलेली आहे.

Pages