भूसंपादन रद्द करून जमीनी परत किंवा स्थायी नोकरी द्या#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



भूसंपादन रद्द करून जमीनी परत किंवा स्थायी नोकरी द्या#chandrapur

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर 

चंद्रपूर : नुकतेच अदानी समूहाने घेतलेल्या कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीचे प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे आज शुक्रवारी पहाटे पाच वाजतापासून कंपनी परिसरातील टॉवरवर चढून विरूगिरी स्टाईलने आंदोन सुरू केले आहे. सहा तासांपासून सहा प्रकल्पग्रस्त हे टॉवरवरच चढून आंदोलन करीत आहेत. आंदोलकांमध्ये आकाश लोडे, अविनाश विधाते, तुषार निखाडे, संजय मोरे, संदीप वरारकर, सचिन पिंपळशेंडे यांचा समावेश आहे.

भूसंपादन कराराचे उल्लंघन करणाऱ्या अंबुजा कंपनीचे भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांना जमीनी परत द्याव्या नाहीतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये स्थायी नोकरी द्यावी आदी मागण्यांकरीता विरूगिरी आंदोलन सुरू आहे. गडचांदूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे व त्यांचे पथक आणि महसूलचे मंडळ अधिकारी चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सचिन पिंपळशेंडे हे सहा प्रकल्पग्रस्त युवक सकाळी 5 वाजे दरम्यान कंपनीच्या शेजारी असलेल्या एका उंच टाॅवर वर चढले. कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीच्या मराठा सिमेंट कंपनीने शासनासोबत केलेल्या भूसंपादन करारातील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स्थायी नोकरीमध्ये प्राधान्य देणे आवश्यक होते. कंपनीने प्रकल्पग्रस्त आदिवासी व गैर-आदिवासी शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवले. त्याऐवजी विविध राजकीय नेत्यांच्या दबावाखाली स्थानिक रहिवासी असल्याचे खोटे दाखले तयार करून बाहेरच्या लोकांना रोजगार देण्यात आला.

मागील पाच वर्षापासून या कंपनीचे प्रकल्पग्रस्त शेतकरी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात लढा देत आहेत. प्रकल्पग्रस्तांना डावलल्याने स्थानिक उपाशी व बाहेरचे उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली. कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वंचीत ठेवल्याने संतापलेले सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी पिंपळगाव येथील आकाश लोडे, अविनाश विधाते, उपरवाहीचे तुषार निखाडे, संजय मोरे, संदीप वरारकर व लखमापूर येथील सचिन पिंपळशेंडे यांनी पहाटे पाच वाजता कंपनी परिसरातील उंच टॉवरवर चढले. तेव्हापासून अद्याप हे युवक विरूगिरी स्टाईलने आंदोन करीत आहेत.

सहा तासाचा कालावधी होऊनही महसुल किंव कंपनीचे अधिकारी यां ठिकाणी पोहचले नाहीत. युवक विरूगिरी स्टाईलने टॉवरवर आंदोलन करीत आहेत. आंदोलनाची माहिती गडचांदूर पोलिसांना होताच पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आंदोलनकांना युवकांनी खाली उतरविण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांनी स्पष्टपणे नकार दिल्याने. मागण्या मान्य झाल्यानंतरच टॉवरवरून खाली येऊ अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाला धडकी भरली आहे.

Pages