Forest Department Exam: वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार उघड; संभाजीनगरात उत्तरे पुरवताना एकाला अटक#forest - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



Forest Department Exam: वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार उघड; संभाजीनगरात उत्तरे पुरवताना एकाला अटक#forest

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

मुंबई पोलीस भरतीनंतर वन विभागाच्या परीक्षेतही गैरप्रकार आढळून आल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वन विभागाच्या भरतीमध्येही अनेक घोळ सुरू असल्याचा आक्षेप नोंदवला आहे.

नागपूर: वन विभागाच्या लेखापाल, लघुलेखक अशा विविध पदांसाठी सोमवारपासून परीक्षा सुरू झाली. परंतु, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगर येथील राणा अकॅडमी येथील परीक्षा केंद्रावर उमेदवारांना उत्तरे पुरवताना विनोद प्रजापती ढोबाळ या आरोपीला अटक करण्यात आली. मुंबई पोलीस भरतीनंतर वन विभागाच्या परीक्षेतही गैरप्रकार आढळून आल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वन विभागाच्या भरतीमध्येही अनेक घोळ सुरू असल्याचा आक्षेप नोंदव.

या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा येत्या ११ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. वनरक्षक भरतीसोबतच सर्वेक्षण, लेखापाल, लघुलेखक तसेच संख्याशास्त्राची पदभरती केली जाणार आहे. टीसीएस कंपनी ही परीक्षा घेत आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगर येथील राणा अकॅडमी या केंद्रावर विनोद ढोबाळे या आरोपीला पकडण्यात आले. परीक्षा केंद्राच्या बाहेरून तो काही उमेदवारांची प्रश्न पाहून त्यांना उत्तरे पुरवीत होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्याला अटक केली. त्याचा प्राथमिक तपास सुरू असल्याची माहिती चिकलठाणाचे पोलीस निरीक्षक गौतम पराते यांनी दिली. विशेष म्हणजे, वन विभागाच्या परीक्षेसाठी पाच लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी राज्यभरात १२९ परीक्षा केंद्रे आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत वनरक्षकांची २,१३८ पदे भरली जाणार आहेत.

राज्यभरातील केंद्रांवर गैरप्रकार?

सध्या संभाजीनगर केंद्रावरून एकच आरोपी पकडण्यात आला असला तरी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची टोळी राज्यभर पसरली असून अनेक केंद्रांवर असे गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. यासाठी सर्व परीक्षा केंद्रे हे टीसीएस कंपनीचेच असावेत अशी मागणी समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.

Pages