खबरकट्टा/चंद्रपूर:
महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलासाठी ही भरती काढण्यात आली असून पोलीस अंमलदार ते सहायक उपनिरीक्षक या पदासाठी ही भरती होत आहे.
यामध्ये सर्वप्रथम 3000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
पहा काय सांगितले राज्य सरकारने
मुंबईतील वाढती लोकसंख्या, विस्तार, व्यापार, गुन्हेगारीसह सर्वच बाबतीतील व्याप्ती पाहता मुंबईत पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी, सरकारने पोलीस भरतीची जाहिरातही काढली आहे.
मात्र, या जाहिरातीतील पदांची संख्या कमी असल्याने आता कंत्राटी पद्धतीने मुंबईसाठी पोलीस भरती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे 11 महिन्यांच्या कंत्राटी करारानुसार ही भरती होईल. यासंदर्भात गृह विभागाने शासन निर्णयही जारी केला आहे.#khabarkatta chandrapur
सध्या हि भरती मुंबई पोलिसांसाठीच आहे मात्र हळूहळू बाकीच्या जिल्ह्यासाठी लागू होईल, त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि खूप धक्कादायक बातमी आहे.#khabarkatta chandrapur