ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील अवैध वाळू तस्करीच्या बातम्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे जणक म्हणून ओळखले जाणारे पत्रकारांनी निवेदन व वारंवार बातम्या लावून शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव, हळदा, रणमोचन, आवळगाव, चिखल-धोकळा, सोंन्द्री, बोढेगाव, बोळधा येथील नदी पात्रातून अवैधरित्या वाळुचा उपसा सुरू आहे.#khabarkatta
ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व बंद रेती घाटातून राजरोस पणे वाळू तस्करांनी नदी पात्र पोखरून टाकले आहे. मागील तीन महिन्यापासून डम्पिंग च्या नावाखाली दिवस-रात्र आधुनिक यंत्राच्या साहाय्याने वाळुचा उपसा सुरू आहे. वाळू माफिया अधिकाऱ्यांना विकत घेतले अशी जनमानसात चर्चा आहे. यामध्ये राजकीय पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.#chandrapur
त्यामुळे प्रशासनाला सोबत घेऊन शासनाचा कोट्यावधी चा महसूल बुडविण्यात येत आहे. तालुक्यातील अवैध वाळू तस्करी स्थानिक प्रशासन च्या डोळ्यासमोर होत असताना सुध्दा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील अवैध वाळू तस्करी च्या बाबत कोणताही मंडळ अधिकारी, तलाठी, कारवाई करण्यास घाबरतात असे काहीसे तालुक्यात चित्र आहे.#brahmpuri
विशेष म्हणजे याबाबत माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, यांना माहिती असुन सुद्धा कारवाई शुन्य आहे. सध्या पर्यावरण विभागाने 27 फेब्रुवारी 2023 आदेश काढून रेती घाट बंद करण्यात आले आहे. तरीही दिवस- रात्री अवैध वाळू तस्करी ची वाहतूक होत आहे. नेमके हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. तालुक्यातील सर्व रेती घाट बंद असताना तहसीलदार याच्या कार्यालयासमोरून अवैधरित्या वाळुची तस्करी केली जात आहे. पण कुठल्याही प्रकारची कारवाई दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी बोढेगाव रेती घाटातून आधुनिक यंत्राच्या साहाय्याने रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपसा सुरू असताना गावकऱ्यांनी संबंधित अवैध वाळू तस्करी ची माहिती तहसीलदार यांना पण त्यांनी फोन उचलला नाही. लगेच दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी तहसीलदार यांना संबंधित अवैध वाळू तस्करी ची माहिती दिली. पण आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
ब्रम्हपुरी तालुका सध्या वाळू माफिया च्या हातात आहे. असे म्हणने वागवे ठरणार नाही. रॉयल्टी च्या नावाखाली बंद रेती घाटातून सुरू असलेला वाळू चा उपसा केव्हा थांबणार हा देखील अत्यंत गंभीर विषय आहे. तब्बल तिन-चार महिण्यात 10-20 कोटींचा वाळू चोरी ला गेली आहे. या अवैध वाळू तस्करी ला आळा घालणार तरी कोण असा प्रश्न नागरिकांत पडत आहे.
