खबरकट्टा/चंद्रपूर:
गडचांदुर:मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्ग अगोदरच हैराण असतांना आज दिनांक 19 ला सायंकाळी 4 च्या दरम्यान गडचांदूर शहरात व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, अनेक शेतकऱ्यांचे अजूनही रब्बी हंगामातील हरभरा,गहू,मिरची हे पीक शेतात उभे आहेत.#khabarkatta
काहींनी पावसाचा अंदाज घेऊन कापणी केली परंतु त्यांचे ढीग शेतातच होते, तर काहींनी ढीग मारून टाकले होते, अचानक झालेल्या गारपिटीने शेतकरी आपल्या शेतातील पिक झाकू शकले नाहीत व त्यामुळे हरभरा,गहू,मिरची ओली झाल्याने नुकसान झाले आहे.#chandrapur
विमा कंपनी व कृषी विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उद्धव पुरी यांनी केली आहे