यंग चांदा ब्रिगेडची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खबरकट्टा / चंद्रपूर :-
कोरोना संकटामुळे जिल्हा प्रशासनांतर्गत मानपाकडे असलेलं सर्व शासकीय आदिवासी वसतिगृह संबंधित विभागाकडे हस्तांतरण करून ते तात्काळ सुरु करावेत, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देण्यात आले,
या वेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सोमेश राजगडकर, वैष्णव वेलादी, मनोहर मेश्राम, नितेश बोरकुटे, सोनू चांदेकर, अजय मेश्राम, तेजेंद्र कुळमेथे, नरेश मेश्राम आदिंची उपस्थिती होती.