खबरकट्टा Exclusive : 2️⃣ चटप परिवाराचे मूसद्दी राजकारण! - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



खबरकट्टा Exclusive : 2️⃣ चटप परिवाराचे मूसद्दी राजकारण!

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
राजुरा विधानसभा क्षेत्राची आगामी निवडणूक ही खबरकट्टा च्या वाचकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली आहे. 2019 मध्ये भाजप युवा मोर्चा चे पदाधिकारी आशिष ताजने यांनी खबरकट्टा च्या माध्यमातून देवराव भोंगळे यांच्या पार्सल उमेदवारी ला विरोध असलेली मोहीम सूरू केल्यानंतर आता मात्र भाजप युवा मोर्चा च्या जिल्हाध्यक्ष पदाचे डोहाळे लागल्यानंतर त्यांनी दादा चा सूर आवळने सूरू केले. मात्र, आम्ही मतदारांच्या प्रामाणिक भावनांसोबत टिकून राहण्याच्या प्रयत्नातून गावाकडचे राजकारण ही मोहीम सूरू करत भाजप माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कथित उमेदवारी जाहीर करण्यामुळे जे वादळ उठले. त्याला पुराव्यानिशी खबरकट्टा ने वाचकांच्या दरबारी सादर केले.त्यामुळे आमचा उत्साह देखील द्विगुणित झाला व लेखणीला बळ मिळाले. तर सादर आहे पुढचा विषय...चटप परिवाराचे मुत्सद्दी राजकारण !

माजी आमदार ऍड वामनराव चटप हे उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने सन्मानित लोकप्रतिनिधी आहेत .या लेखात आपण पार्सल उमेदवारिला चटप परिवार का घालतंय खत-पाणी व त्याच्या खास कारणांवर विशेष चर्चा करणार आहोत.

आमदार म्हणून जनसामान्यांचे प्रश्न विधानसभेत उचलून धरत शासनाला जेरीस आणणाऱ्या चटप साहेबांच्या राजकीय कारकीर्दीला गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागली आहे. त्यांची विश्वासार्हता व जनाधार दिवसागणिक कमी कमी होत चालली आहे. सलग तीन वेळा विधानसभेत व लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने व भविष्य निश्चित नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र संघटनेला आता दुसराच प्रश्न भेडसावत आहे तो चटप साहेबांच्या वारस्याचा.

याच मुख्य कारणामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रबळ दावेदार मानली जाणारी शेतकरी संघटना देखील जनाधार गमवती होताना दिसून येत आहे.आता या दिमातीला त्यांना भविष्याचे गाजर दाखवत कार्यकर्ते व निवडणुकीला रसादपूर्तकर्ते टिकवून ठेवणे कठीण जात आहे. रसदपूर्तकर्ते आता वेळेवर चाट देऊ लागल्याचा अनुभव 2019च्या निवडणुकीत त्यांना घातक ठरला. आता हेच कार्यकर्ते व रसदपुरवठादार साहेबांच्या वारस्याची चर्चा करताना 2029 च्या निवडणुकीपर्यंत साहेबांचा वारसा टिकवायचा असेल तर् 2024 ची निवडणूक लढविणे आवश्यक असल्याचे सांगत खरा वारसदार साहेबांचा परिवार निर्माण करू शकला नाही याची खंत बोलून दाखवतात.

तर् राजुरा येथील एका चटप समर्थक व्यापारी परिवाराने चटप साहेबांचे भविष्य हा दीपक चटप असल्याची भविष्यवानी करत 2029मध्ये निवडून आणण्याकरिता या वेळेस बळी गेला तरी चालेल परंतु साहेबांना निवडणुकीच्या रिंगणात उभे ठेवणे का आवश्यक आहे याची लांबलचक चर्चा काही दिवसांपूर्वी टीम खबरकट्टा सोबत केली. त्यातून आमच्या चटप परिवार देवराव भोंगळेच्या राजुरा विधानसभा उमेदवारीला का खत-पाणी घालत आहेत हे ध्यानात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पार्सलच्या माध्यमातून खेळी खेळून आपले मुत्सद्दी राजकारण चटप साहेब आजमावू पाहत आहे.भोंगळे यांच्या उमेदवारीला प्रोत्साहन देण्यामागे मागील काही निवडणुकिंचे आकडे कारणीभूत आहेत. शिवाय वामनराव चटप आणि शेतकरी संघटनेचा घसरता आलेख आपण बघितला तर साहेब अती आत्मविश्वासाने ग्रस्त असल्याचे आपल्याला दिसून येईल.

2009 मध्ये संजय धोटे यांना संघटनेने उमेदवारी दिली त्यांनी 45389 मते घेतली ,2014 मध्ये प्रभाकर दिवे यांना उमेदवारी दिली तेव्हा संजय धोटे 66223 मतदान घेतले तर् संघटनेच्या उमेदवार दिवे यांना 16429 मते घेतली.खरी गोम या आकडेवारीत आहे. धोटे ते दिवे या उमेदवारी दरम्यान 28960 मतांचा फरक शेतकरी संघटनेला भेडसावत आहे.साधारणपणे यात जो 25 हजार मतांचा फरक आपण बघतो त्यावर शेतकरी संघटनेचा पर्यायाने चटपांचा डोळा आहे.

2019 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराने त्यांना उघडपणे आर्थिक रसद पुरविली असे सर्व उघड असताना भोंगळे यांच्या उमेदवारीचा वापर होतोय व यात त्यांचा गेम होणार आहे हे स्पष्ट आहे. 25000 मतांच्या या गणिता बाबत व धोटे ऐवजी भोंगळे यांना उमेदवारी मिळाल्यास ही मते संघटने कडे परत येतील व देवराव यांचा गेम आम्ही करणार याबाबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उघड बोलत आहेत. यातच चटप यांचे मुत्सद्दी राजकारण स्पष्ट होते. येणारा काळच याचे उत्तर देणार आहे.

त्यांच्या हा राजकारणाला देवराव भोंगळे यांच्या सारखा तरुण नेता बळी पडत आहे ,चटपांचे राजकारण देवराव यांच्या लक्षात येऊ नये इतके ते दुधखुळे आहेत का ? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. देवराव भोंगळे यांच्या दावणीला शेतकरी संघटनेचे नीरज मत्ते, स्वप्नील पहानपटे, राजकुमार डाखरे सारखे कार्यकर्ते जोडून देणे. केतन जुनघरे सारख्या पद न मिळाल्यामुळे संघटनेत नाखुश असलेल्या कार्यकर्त्याला थेट युवा मोर्चा तालुकाप्रमुख पदाची लालसा असली तरी मामा चा मामू करण्याकरिताच पाठविण्यात येणार असल्याचे कळते.अशी अनेक उदाहरण देता येतील जी मामू बनवायला संघटनेच्या तालमीत रोज तयार होत आहेत.

धोटे हे स्थानिक नेते म्हणून त्यांचे पारडे जड होऊ नये म्हणून देवराव भोंगळे यांना अप्रत्यक्षपणे मदत करणे ही चटपांची राजकीय खेळी आहे. हे सर्व उघड असताना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सारखा सुज्ञ राजकारणी देखील या सर्वाचा गंभीरपणे विचार करत नाही याचे आश्चर्य वाटते.

सलग तीन वेळा पराभवाची धूळ चाखणारे चटप दरवेळेस "ही शेवटची निवडणूक" म्हणून मतदारांना मतांचा जोगवा मागतात.वयाची सत्तरी पार करूनही निवडणुकीत उभे राहण्याचा मोह काही त्यांना आवरत नाही. आता चटप परीवारातील कोणाला तरी स्टेबल करत आपला राजकीय वारसा पुढे न्यायचा असे त्यांचे नियोजन नक्कीच आहे.पण त्यांच्या मूळ परिवारात त्या योग्यतेचे कोणीही नसल्याने 2019 पासून ऍड दीपक चटप यांच्याशी संधान साधून त्या माध्यमातून चटप परिवाराचा वारस पुढे आणण्याची पूर्ण चिन्हे आहेत.  दीपक यांनी आपली बौद्धिक योग्यता वेळोवेळी सिद्ध केल्याने शेतकरी संघटनेकारित भविष्यातील योग्य उमेदवार ठरणार यात कोणतेही दुमत नाही त्यामुळे त्यांना आतापासूनच समर्थन देत 2029चा मार्ग सुकर होण्याकरिता त्याकरिता त्यांना भाजपने तुलनात्मक कमकुवत उमेदवार द्यावा असे साहेबांना
वाटत असावे.

नुकत्याच झालेल्या ओबीसी आंदोलनादरम्यान चुकीचे फीडबॅक देत देवराव भोंगळे यांनी भाजप नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची केलेली दिशाभूल व ओबीसी वर्तुळात देवराव यांना नसलेली किंमत हा आणखी एक अँगल महत्वाचा ठरत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना झालेले विविध गैरव्यवहार,विवेक बोढे यांचे प्रकरण यामुळे देवराव भोंगळे यांची प्रतिमा आधीच डागाळलेली असताना आता पार्सल उमेदवार म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्रात उठलेले वादळ त्यांना नक्कीच महागात पडणार आहे. शिवाय चटपांचे राजकारण देवराव भोंगळे यांना भोवणार हे देखील नक्की.

पुढे वाचा....

3️⃣ काँग्रेस च्या धोटे गटात एकीचे बळ!
4️⃣ गोंडवाना ठरणार निर्णायक!
5️⃣ घुग्गुस ची पार्सल डिलिव्हरी राजुऱ्यात...!

लवकरच वाचा ...गावाकडचे राजकारण या खबरकट्टा च्या राजुरा विधानसभेवरील मालिकेदरम्यान एका सुज्ञ वाचकाने  तथाकथित मामा (दादांच्या ) घोटाळ्याबद्दल पाठविलेले निनावी पत्र जसेच्या तसे....

वाचत रहा...खबरकट्टा 

Pages