चंद्रपूर - राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.
याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपुरात धानोजे कुणबी समाज , भवन लक्ष्मी नगर येथे नियोजन बैठकीचे आयोजन केले, होते ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये व बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावे आधीच ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे,मराठा समाजाने आजपर्यंत मोठे मोर्चे काढले आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली आहे.
सोमवार पासून11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे.17 सप्टेंबर ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी मोडणाऱ्या सर्व जात संघटनेचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
बैठकीत धानोजे कुणबी समाजाचे ऍड पुरुषोत्तम सातपुते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ अशोक जीवतोडे , महासचिव सचिन राजूरकर, कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, प्रा अनिल शिंदे, विदर्भ तेली महासंघचे सूर्यकांत खनके, माळी महासंघचे डॉ संजय घाटे, अध्यक्ष अरुण तीखे ,चंद्रपूर माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर , ओबीसी सेवा संघाचे अनिल डाहाके, पारस पिपलकर, हितेश लोडे,राजेंद्र खांडेकर, रणजित डवरे, अक्षय येरगुडे, ऍड पाचभाई, मनीषा बोबडे, गोमति पाचभाई उपस्थित होते.