राजीनामा :अखेर जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षांनी दिला राजीनामा, पत्रपरिषदेतून घोषणा, अविश्वासाची होती तयारी #tikaram_kongre #yavtmal - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राजीनामा :अखेर जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षांनी दिला राजीनामा, पत्रपरिषदेतून घोषणा, अविश्वासाची होती तयारी #tikaram_kongre #yavtmal

Share This
खबरकट्टा / यवतमाळ :
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी काल अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने यवतमाळ च्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.अडीच वर्षांपूर्वी दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या आशीर्वादाने अचानक मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या प्रा. कोंगरे यांनी राजीनामा दिल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Tikaram Kongare) अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी त्यांची मुदत संपण्यापूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 94 शाखांचा विस्तार असलेल्या या शेतकर्‍यांच्या बँक अध्यक्षाने ऐन कृषी हंगामात दिलेल्या या राजीनाम्यामुळे जिल्हाभरातील राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत आला आहे. मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. कोंगरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, संचालक अ‍ॅड. शंकर राठोड, प्रकाश देवसरकर, शिवाजी राठोड, राजुदास जाधव व मोहन राठोड उपस्थित होते. हे सर्व संचालक आणि पत्रकारांच्या साक्षीने प्रा. कोंगरे यांनी आपला राजीनामा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद मिरगे यांना सुपूर्द केला.
टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉंग्रेसमध्ये मोहीमच उघडण्यात आली. नेते मंंडळींनीही राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केला. राजीनामा व्हावा परंतु नवीन येणारा अध्यक्ष कॉंग्रेसचाच राहावा अशी भूमिका आहे. कोंगरे यांच्याकडून राजीनामा देण्यासाठी विलंब होत असल्याने त्यांच्यावर दबाव वाढविण्यात आला. दारव्हा मार्गावरील एका हॉटेलमध्ये बॅंक उपाध्यक्षांसह १६ संचालक उपस्थित होते. त्यांनी अविश्वास प्रस्ताव तयार करून त्यावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. दुपारपर्यंत निर्णय झाला नसता तर हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी होती. राजीनामा दिल्यामुळे ही प्रक्रिया थांबली. आता पुढील निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत उपाध्यक्षांकडे अध्यक्ष पदाचा प्रभार दिला जाणार आहे. अनुभवी उपाध्यक्ष म्हणून वसंत घुईखेडकर यांच्याकडे हा प्रभार राहणार आहे. यासाठी तीन दिवसांत बैठक बोलविण्यात आली आहे.

साधारणपणे पाच वर्षांच्या मुदतीसाठी Tikaram Kongare प्रा. टिकाराम कोंगरे यांची यवतमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पण 'माझा 2 वर्षे 7 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला वाटले म्हणून राजीनामा देत आहे', असे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. सुमारे अडीच वर्षांपूर्वी बँकेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आलेले प्रा. टिकाराम कोंगरे अनपेक्षितरित्या अध्यक्ष झाले होते. महाराष्ट्रातील एकमेव काँग ेसी खासदार बाळू धानोरकर यांनी त्यावेळी प्रतिष्ठेचा मुद्दा करून प्रा. कोंगरे यांना अध्यक्ष करवून घेतले होते. परंतु, खा. धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे कोंगरे यांच्या अध्यक्षपदाची खुर्ची हलविण्याचे काम बँकेच्या ज्येष्ठ संचालकांनी सुरू केले होते.

प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या अध्यक्षपदाचा अर्धा कार्यकाळ एक महिन्यापूर्वी संपला आणि इतर संचालकांच्या हालचालींना वेग आला. सुरवातीला Tikaram Kongare प्रा. कोंगरे यांना राजीनामा देण्यास सुचवून पाहण्यात आले. परंतु त्यांना त्यांचे नेते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नाही, असे सांगितले होते, असे प्रा. कोंगरे यांनीच पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याचा वरदहस्त नसलेले प्रा. कोंगरे राजीनामा सहजासहजी देणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर यवतमाळ जिल्हा बँकेचे सारेच ज्येष्ठ हितैषी कामाला लागले. अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणून त्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय त्यांना एकटे पाडून घेण्यात आला. या वस्तुस्थितीची जाणीव झाल्यानंतर मात्र प्रा. टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल.

अडीच वर्षांत खूपकाही केले :

आपल्या अध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या पीककर्जामध्ये 20 टक्के वाढ करण्यात आली. त्यांचे थकित कर्ज भरणा करणे सुलभ होण्यासाठी एकमुस्त कर्ज परतफेड योजना (ओटीएस) राबवण्यात आली. 2022-23 या आर्थिक वर्षात बँकेचा 5154 कोटींचा व्यवसाय झाला असून आज बँकेजवळ 3 हजार कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 700 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या 94 पैकी 44 शाखा तोट्यात होत्या. यावेळी मात्र केवळ 22 शाखा तोट्यात आहेत. यासोबतच आम्ही अनेक अत्याधुनिक बाबी बँकेत सुरू केल्या आहेत, असे अध्यक्ष Tikaram Kongare प्रा. टिकाराम कोंगरे यांनी यावेळी सांगितले.

Pages