संजय गांधी निराधार योजना हि गोरगरीबांचे सेवा करण्याचे मोठे माध्यम आहे.अलीकडे संयुक्त कुटुंबव्यवस्था नावापूरतीच उरली आहे.एकदा लग्न झाले कि जो तो आपला परिवार बघतो.अशा स्थितीत कुटुंबातील जेष्टांची मोठीच पंचाईत होते.वय जास्त असल्याने हि मंडळी काही करू शकत नाही.अशावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळतो.ग्रामीण भागातील अशा गोरगरीबांच्या सेवेसाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप नेते साईनाथ माष्टे यंानी मांडले.सेवेची संधी दिल्याबददल जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,देवराव भोंगळे यांनी सेवा करण्याची संधी दिल्याबददल मास्टे यंानी त्यांचे आभार मानले आहे.
साईनाथ माष्टे यांची गोंडपिपरी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
माष्टे यांची निवड झाल्यांनतर आज तहसिल कार्यालयात तहसिलदार शुभम बहाकार यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष नगरसेवक बबन निकोडे, पंचायत समितीचे माजी सभापती दिपक सातपूते,स्वाती वडपल्लीवार,प्रविण धोडरे यंाच्यासह अनेकंाची उपस्थिती होती.