खबरकट्टा/चंद्रपूर:
जिल्ह्यात 21 ते 24 जुलै या कालावधीत पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील सहा हजार 518 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. पावसाने दोनशे गावे बाधित झाली असून, दहा हजार 421 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यातून ही माहिती समोर आली आहे.#khabarkatta chandrapur
21 ते 24 या कालावधीत जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. चार दिवसांच्या पावसाने जिल्ह्यातील सहा हजार 518 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात धान सहाशे अठरा हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या एक हजार 349 आहे.#khabarkatta chandrapur
कापसाचे तीन हजार 840.40 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांची संख्या पाच हजार 870 इतकी आहे. दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन हजार 384 इतकी आहे. 444 हेक्टर क्षेत्रावरील तुरीचे नुकसान झाले. 41 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपालाचे नुकसान झाले. तीन दिवसांतील पावसाने जिल्ह्यातील सहा हजार 518 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे.#khabarkatta chandrapur