खबरकट्टा/चंद्रपूर:
राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.#khabarkatta chandrapur
पहा काय म्हणाले शिक्षणमंत्री
कारण तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत.#khabarkatta chandrapur
मात्र जर एखाद्या शिक्षकाला बदली करायचीच झाल्यास त्यासाठी विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, तसेच याबाबत लवकरच आदेश देखील काढण्यात येणार आहे, असेही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.