पत्रकारांना धमकी दिल्यास 50 हजार दंड व 3 वर्षांचा तुरुंगवास...#50 thousand fine and 3 years imprisonment for threatening journalists - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पत्रकारांना धमकी दिल्यास 50 हजार दंड व 3 वर्षांचा तुरुंगवास...#50 thousand fine and 3 years imprisonment for threatening journalists

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

मुंबई हायकोर्टाच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे की, पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना 50,000 हजारांचा दंड आणि पत्रकारांशी गैरवर्तन करणान्याला 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. पत्रकाराला धमकी देणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल. पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही#khabarkatta chandrapur 

मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा आणि मदत करा आणि पत्रकारांशी आदराने बोला, नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचान्यांवर एफआयआर नोंदवला जाईल, अन्यथा एसपीवर कारवाई केली जाईल कारण पत्रकार जमावाचा भाग नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे (Press Council of India) अध्यक्ष मार्कडेय काटजू यांनी राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

कोणत्याही ठिकाणी हाणामारी किया गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत, पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाही. पोलिस किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. काटजू म्हणाले, असा एखादा वकील आपल्या अशिलाच्या हत्येचा खटला न्यायालयात लढतो तसा तो खुनी होत नाही. तसेच पत्रकार त्याचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात पण ते गर्दीचा भाग नसतात. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.#khabarkatta chandrapur 

यासंदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सर्व राज्यांच्या गृह सचिवांना सूचना पाठवल्या असून पत्रकारांसोबत पोलिस किंवा निमलष्करी दलाकडून होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांवर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी.#khabarkatta chandrapur 

पत्रकारांसोबत पोलिसांनी केलेला हिंसाचार हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानला जाईल. जो घटनेच्या कलम 19A मध्ये देण्यात आला आहे आणि घटनेच्या या कलमानुसार गैरवर्तन करणाऱ्या पोलिस किंवा अधिकान्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाईल.


Pages