केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले आणि महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. जे नाव आणि चिन्ह असंख्य शिवसैनिकांचा स्वाभिमान होता ते अचानक शिंदे गटाला बहाल झाल्याने उद्धव ठाकरे संतापले,सभा घेतल्या,निवडणूक आयोगासह पंतप्रधान मोदी,अमित शाह,शिंदे,फडणवीस यांच्यावर आगपाखड़ केली, त्यांना दूषणे दिली.#uddhavthackeray
निवडणूक आयोगाच्या या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली,सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरेंची उरली सुरली आशा मावळली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षा बाबत सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण सुरु आहे त्याबद्दल देखील आता उद्धव ठाकरेंना फार आशा नाही.त्यातल्या त्यात त्यांची बाजू लढणारे मुख्य वकील कपिल सिब्बल यांनीही "माझ्याच्याने जेवढे शक्य होते तेवढं मी केलं आता निकाल सर्वोच्च हाती"असे कळविण्यात आल्याचे आमच्या मुख्य सूत्रांकडून कळते.#shivsena
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे रक्त आहे.अश्या निर्णायक स्थितीत एवढ्या तेवढ्याने हार मानतील ते उद्धव ठाकरे नाही. पण प्राप्त परिस्थितिला सामोरे जावे लागणारच.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदेंच्या बाजूने लागला तर नवा पक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. ही शक्यता लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरु केल्याचे खात्री लायक वृत्त आहे.#khabarkatta
त्या दृष्टिने उद्धव ठाकरेंनी आपल्या विश्वासु सहका-यांसह होळीच्या पूर्वसंध्येला चर्चा देखील केली आहे.त्याकरिता एका लिगल फर्म ची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली असून नव्या पक्ष्याच्या घटनेवर काम सूरू आहे. याही घटनेत जुन्या शिवसेना पक्षाचा गाभा असणार आहे तर् सर्वोच्च अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहत तेच पक्षप्रमुख राहतील अशीच मांडणी होण्याची शक्यता आहे.
शिवशक्ति असे या नव्या पक्षाचे नाव?
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या अती गोपनीय बैठकीत सहकाऱ्यांनी 5नावे सुचविली त्यापैकी स्वतः उद्धव यांनी "शिवशक्ती" हे नाव जास्त दमदार असल्याचे सुचवत याच नावाने पुढे चालूया असे उद्गारवचन केल्याने शिवशक्ति असे या नव्या पक्षाचे नाव असणार आहे.
नेमकी काय आहे शिवशक्ती संकल्पना!मुळातच शिवसेनेच्या स्थापनेत शिव हे नाव हिंदू देवता च्या नावावरून नव्हे तर् स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबोधनातून घेण्यात आले होते. स्वराज्याची सेना म्हणून शिवसेना हे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनी लेखक पु. ल. देशपांडे यांच्या त्याकाळच्या मराठी माणसांच्या सुरक्षा व विकासाकरिता सूरू असलेल्या आंदोलनातून घेतले होते. आता पक्षात दुफळी निर्माण झाल्यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची चिन्हे असल्याने ठाकरे एक भव्य शक्ती म्हणून आपल्याला उभे राहणे आवश्यक असल्याने शिवसैनिकांची एक भव्य शक्ती अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे हिच संकल्पना घेऊन "शिव"सोबतीला "शक्ती" जोडण्याचा विचार आहे.
शिवशक्ती नावाला गणेश नायकांचा अडसर
नव्या पक्षास माजी शिवसैनिक गणेश नाईक यांचा अडसर असल्याची कुजबुज देखील सुरु आहे.उद्धव ठाकरेंच्या नव्या पक्षाचे शिवशक्ती नाव त्यांच्या सल्लागारांच्या सर्वसहमत असले तरीही यात एक अडसर आहे. गणेश नाईकांनी शिवसेना सोडल्यावर एक मुंबईत संगठन स्थापन करून साधारण दीड वर्ष याच नावाने कार्य केले. त्यामुळे आता हे नाव सहज मिळण्यासाठी अडसर होईल असे दिसते तरीही नाईकांचे संगठन हे पूर्णतः सामाजिक होते म्हणजेच राजकीय नसल्याने उबाठा ला शिवशक्ती नाव मिळू शकते.
हा नवा पक्ष महराष्ट्रात रुजविणे हे उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान आहे. बाळासाहेबांच्या निधना नंतर अनेक आव्हाने उद्धव ठाकरेंनी समर्थपणे पेलल्याचे महराष्ट्राने अनुभवले आहे. पण उद्धव ठाकरे हे जिद्दी व परिश्रमी आहेत. खऱ्या शिवसैनिकांची शक्ति एकत्र करून नवी शिवशक्ति महराष्ट्रात ते आणतील यात मुळीच दुमत नाही. त्यांची ही शिवशक्ति भाजपा - शिवसेनेला ( शिंदें) येणाऱ्या काळात तगडे आव्हान देते किंवा नाही हे वेळच सांगेल!#khabarkatta