राज्यात येणार उष्णतेची लाट - हवामान विभागाचा इशारा जारी...#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राज्यात येणार उष्णतेची लाट - हवामान विभागाचा इशारा जारी...#chandrapur

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी तापमानत वाढ होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 ℃ च्या आसपास राहण्याची शक्यता आहे, रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक उचांकी तापमान 37.9 अंश नोंदवले गेले, तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा 40℃ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येहि तापमानाचा पारा 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांत येत्या 48 तासांत उन्हाचे चटके वाढणार असल्याने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Pages