शेतकऱ्याने ठाणेदारांसमोरच विष प्यायले - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शेतकऱ्याने ठाणेदारांसमोरच विष प्यायले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर ::जिवती

जिवती तालुक्यातील टेकामांडवा गावातील शेतकरी शिवाजी करेवाड वय 45 याने जमिनीच्या वादातून वैतागून टेकमांडवा येथील ठाणेदार महेशकर यांच्या समक्ष तननाशक (हाज्याक नावाचे) विषारी औषध प्राशन केले.

ठाणेदाराने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिवाजीला तात्काळ शिपायांमार्फत ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे पाठवले. शिवाजीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याची प्रकृती स्थिर आहे

शिवाजी यांचे भाऊ नवनाथ करेवाड यांनी सांगितले की, आमच्या वडिलांनी सोपान करेवाड यांच्या नावावर जमीन भाडेपट्ट्याने घेतली आहे, वडील मरण पावले आहेत, त्यांच्या पश्चात आई व पाच भाऊ वारसदार आहेत.

विश्वनाथ आमनेर यांचे शेत आमच्या शेतापासून थोडे अंतरावर आहे, त्यामुळे नेहमीच वावरत असतो. तो नेहमीच आपल्याला त्रास देतो, आपल्या शेतावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे नेहमीच वाद होतात.

कधी रात्रीच्या अंधारात आमच्या शेतातील विजेच्या तारा कापल्या जातात, कधी पाण्याचे पाईप फोडून चोरी केली जाते, कधी शिवीगाळ केली जाते, आम्ही ठाण्यात अनेकदा तक्रारी केल्या, पण काहीही झाले नाही. आम्ही नकार दिला, पण विश्वनाथ आमणेर यांनी गव्हाची लागवड केली. दोन महिन्यांपूर्वी शेतात तो नेहमी कुटुंबासमवेत शेतात जेवत असे, आम्ही नकार दिल्यावर शिवीगाळ करून भांडण करायचे.

9 जानेवारी च्या रात्री 20 ते 25 लोक शिवाजीला मारण्याच्या इराद्याने शेतात गेले होते, पण शिवाजी परत गावात आला, गावातील लोकांना सांगितले की, ते सर्व लोक बघून , आम्ही शांत झालो.विश्वनाथ आला आणि शिवजींना शिवीगाळ केली, म्हणून 9 वाजता थेट ठाण्यात गेले, मात्र त्याचे ठाण्यात कुणीही ऐकले नाही, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले.

ठाणेदार महेशकर म्हणाले की, हा शेतीचा प्रश्न आहे, आम्ही हे प्रकरण एसडीएमकडे पाठवले असून, दोघांनाही बंदीची नोटीस दिली आहे, आम्ही शेतीच्या बाबतीत काहीही करू शकत नाही.

Pages