खबरकट्टा /चंद्रपूर :वरोरा :
१ ते ५ वर्गाची शाळेची घंटा वाजताच बंद झालेल्या शाळा कोव्हीडच्या या वादळानंतर पहिल्यांदाच आता पुन्हा सुरू झाल्या असून, शिक्षकांपूढे व पालकांपूढे आव्हान अधिक मोठे असतानाच मानवताधिकार आयोग ग्रामीण संघाच्या संघटिका रजनी मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , आनंदवन येथील पहिल्याच दिवशी त्यांना मास्क व स्विट चाँकलेट वाटप करून यासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना पासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांना मास्क व चाँकलेट देवून त्यांना महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या.
यावेळी भोई समाज संघटनेच्या चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उपशहर संघटिका अल्का पचारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवनचे मुख्याध्यापक वसंत दुथपचारे, आदिवासी कला संवर्धन समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा कलाशिक्षक परमानंद तिराणिक, विषय शिक्षक विलास मुरसस्कर, ज्ञानेश्वर घागी, अर्चना महाकाळकर शिक्षिका, अनामिका आत्राम, रोहीनी अनिवार आदिंची उपस्थिती होती,