बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत व संचालक डॉ. विजय देवतळे यांचे सहकार्य व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते मदतीचा धनादेश वितरीत
खबरकट्टा /चंद्रपूर भद्रावती :
शेतकरी हा ग्रामीण भागातील कणा आहे. शेतीच्या भरोश्यावर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चालते. शेतीशी संलग्नीत व्यक्ती, पशु, साहित्य या साधनांची हानी झाल्यास शेतीचा कणा तूटतो. मात्र शेतक-याच्या सदैव पाठीशी राहणारी जिल्हा बँक शेतक-याच्या अस्मानी व सुल्तानी संकटात नेहमी धावून आली आहे. जिल्हा बँकेच्या 'शेतकरी कल्याण नीधी' योजनेअंतर्गत आजमितीला जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना शेतीपुरक साहित्य व जनावरांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
तालुक्यातील लोणारा (पारखी) या गावचे शेतकरी निखिल ज्ञानेश्वर गोचे यांचे वडील ज्ञानेश्वर गोचे यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यु झाला. तर गोरजा येथील शेतकरी गजानन किसन ठेंगणे यांच्या बैलाचा नुकताच सर्पदंशाने मृत्यु झाला. त्यांना शेतीकामात फार अडचण येवू लागली.
याची दखल घेत, आज (दि.१२) ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भद्रावती यांचे सौजन्याने बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत व संचालक डॉ. विजय देवतळे यांचे सहकार्याने व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते तालुक्यातील लोणारा (पा.) येथील शेतकरी निखिल ज्ञानेश्वर गोचे व गोरजा येथील शेतकरी गजानन किसन ठेंगणे यांना बँकेचे 'शेतकरी कल्याण नीधी' योजनेअंतर्गत दहा हजार रुपये रोख रकमेची मदत करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता भास्कर ताजणे, लोणारा ग्रा.पं.चे सदस्य संजय पायपरे, मोहबाळा सेवा सह. संस्थेचे अध्यक्ष राजु पारखी, पोलिस पाटील सुनिल खोंडे, गोरजाचे सरपंच अरुण टेकाम, पोलिस पाटील संतोष बलकी, गोरजा सेवा संस्थेचे सदस्य संगित नळे, शाखाधिकारी संजय जेनेकर, निरिक्षक अरुण मांडवकर, आदी उपस्थित होते.
यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या विविध कल्याणकारी योजना असुन कास्तकारांनी व शेतमजुरांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
सोबतच ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या कामांची व योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व गरीब-गरजु कूटुंबातील पाल्यांच्या विवाहाचा खर्च ट्रस्ट करणार असुन त्याबाबतची नोंदणी अभियान सुरु झाले आहे. इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च ट्रस्ट उचलत आहे. तेव्हा गरजुंनी ट्रस्टच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी यावेळी केले.