खबरकट्टा /चंद्रपूर :
ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात जातिनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्या असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तयवाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तर्फे ठाणे (मुंबई) येथे सिंहावलोकन या एकदिवसीय शिबिराचे आयोजन ग्रॅण्ड सत्कार येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली तर बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर , महाराष्ट्र राज्याचे समन्वयक माजी आमदार बाळासाहेब विशे, भालचंद्र ठाकरे उपजिल्हाधिकारी , उपाध्यक्ष शेषराव येलेकर , उपाध्यक्ष रमेशचंद्र घोलप, सहसचिव शरद वानखेडे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरत, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कल्पना मानकर, युवा महासंघाचे सुदर्शन बोराडे उपस्थित होते.
या शिबिरात केन्द्र सरकारशी संबंधित ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. त्यामध्ये २०२१ मधे राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा विषयी चर्चा, केंद्रात ओबीसी मंत्रालय ओबीसीन समाजाला लावण्यात आलेल्या क्रिमिलेअरच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी, ,सरकारी कर्मचा-यांना पदोन्नतीमधे आरक्षण, ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू झाले पाहिजे , १००% शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, राष्ट्रीय ओबीसी संघाचे मुखपत्र सुरु करणे, तसेच राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या संघनत्मक बाबीवर चर्चा करण्यात आली सर्व शाखांचा आढाव घेण्यात आला व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढील देशव्यापी कृती आराखडा ठरवण्यात आला. त्यात दिनांक १८ व १९ डिसेंबर २०२१ ला आंबेडकर भवनाच्या मैदानात राणी झाशी मार्ग न्यू दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, पैगाम,द पीपल, ऐसआरये यांच्या संयुक्त विध्यमाने मोठे संमेलन घेण्याचे ठरविले आहे. या सिंहावलोकन शिबिराला राष्ट्रिय कार्यकारीणी सदस्य ,तसेच देशभरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महिला महासंघ, युवा महासंघ, वकिल महासंघ,विध्यार्थी महासंघ राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महिला महासंघाचे प्रतीनीधी शिबिराला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, यांनी केले आभार गुणेश्वर आरिकर यांनी मानले तर सूत्रसंचालन शकील पटेल यांनी केले . शिबिर यशस्वी होण्यासाठी संजय पन्नासे, राहटे सर विजय पटले, रोशन कुंभलकर, रुषभ राऊत, मयूर वाघ, सोनिया वैद्य, आश्विनी गुरनुले यांनी परिश्रम घेतले.