स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा तालुक्यातील तिन अल्पवयीन अपहृत मुलींची पुणे येथून केली सुटका केली असुन चार आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर :
सविस्तर वृत्त असे की, दि.२७/०९/२०२१ रोजी वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली त्यांचा मैत्रीणचा वाढदिवस असल्याचे सांगून सकाळच्या वेळीच ह्या मुली घरून निघुन गेल्या होत्या. मुली सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने मुलींच्या आई वडीलांनी व ईतर नातेवाईकांनी मुलींचा सर्वत्र शोध घेतला मात्र कोणत्याही मैत्रिणी, तसेच परिचित लोकांना त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती नसल्याने मुलींचा शोध लागु शकला नाही त्यामुळे अखेर मुलींच्या नातेवाईकांनी पो.स्टे. वरोरा येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुलींना कोणीतरी अज्ञात इसमांनी फुस दिली.

वरोरा पोलिसांनी अप.क. ७२७/ २०२१, ७२८/२०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये अज्ञात आरोपीता विरुद्ध मुलींना फुस लावून पळवून नेल्या बाबत गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरू केले. सदर दोन्ही मुलींचे वय १५ वर्षांचे आतील असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ सदर गुन्हयाचा छडा लावण्या करीता सुचना दिल्या.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक खाडे ह्यांनी तात्काळ स.पो.नि जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, सचिन गदादे, अतूल कावळे यांचे नेतृत्वात चार पथक तयार करून शोध मोहिम सुरू केली. पथकाने घटनास्थळावर जावून गुन्हयाची सखोल माहिती गोळा केली. मिळालेल्या माहितीवरून सदर मुलींच्या संपर्कात यवतमाळ जिल्हयातील राळेगांव येथील काही मुले असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यावरून स्था.गु.शा.चंद्रपरची तिन पथके तात्काळ राळेगांव येथे तपास कामी रवाना झाले. त्या ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पो.स्टे.बाबुळगांव जि.यवतमाळ हद्दीतील एका मुलगी अज्ञात इसमाव्दारे अपहरण केल्या बाबत दि. २७/०९/२०२१ रोजी अप.क्र. ४१७/२०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये नोंद करण्यात आली.