खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर :
बल्लारपूर नगर परिषद अंतर्गत ई-निविदे द्वारे दिल्या जाणाऱ्या कामांमध्ये मुख्याधिकारी वाघ यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना ई-निविदा दिल्याचा शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड. मेघा भाले नी आरोप केला आहे. विशेषतः या निविदा काढतानाच मुख्याधिकारी ती कामे काही निवडक कंत्राटदारांनां मिळण्याच्या हेतूने त्या कंत्राटदारांना सोईस्कर अटी शर्ती टाकतात त्यामुळे इतर कंत्राटदारांना या निविदा प्रक्रियेत भाग घेता येत नसल्याने सुशिक्षित बेरोजगार व इतर कंत्राटदारांना कामे मिळत नाहीत #ballarpur
या संदर्भात ऍड. भाले यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांवार आरोप करत निवेदन सादर केले. त्यानुसार नगर परिषद बल्लारपूर द्वारे ई निविदा (२०२३_DMA _९३०७९९_१ ) दिनांक १/०८/२०२३ ला प्रसिद्ध झाली होती.ती निविदा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) अंतर्गत नगर परिषद बल्लारपूर शहरातील बगीचाचा विकास व जतन, दुभाजकावरील झाडाचा विकास व जतन तसेच स्व. साधुसिंग चंदेल चौक येथील येथील फवारा व लान चा विकास व जतन करणे बाबत प्रसिद्ध केला होता त्यामध्ये तुम्ही जाणून बुजून अशा अटी व शर्ती टाकल्या कि ज्यामुळे फक्त तुमच्या मर्जीतला खास व्यक्तीला ते टेंडर मिळाले पाहिजे.
वर्ष २०२२ - २०२३ ला हीच निविदा नगर परिषद बल्लारपूर द्वारे प्रसिद्ध केली होती व युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था यांना दिले होते त्यावेळेस १० बगीचाचे एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विकास व जतन केल्याबाबतचा अनुभव प्रमाणपत्र ची अट घातली नव्हती. तुम्ही तुमच्या मर्जीतील एका खास व्यक्तीला बल्लारपूर नगर परिषदेतील काम मिळावे म्हणून त्याचा मताप्रमाणे निविदातील अटी व शती घालून जास्तीत जास्त काम दिलेले आहे त्यामुळे दुसरा कोणीही निविदा टाकू शकत नाही, जितक्या किमतीतील निविदा असेल तेवढा किमतीमध्ये त्या व्यक्तीला काम देण्यात येत आहे.
यावरून स्पष्ट होते कि आपण नगर परिषदेच्या हिताचे काम करीत नाही व प्रतिस्पर्धा नसल्यामुळे नगरपरिषदे नुकसान होत आहे व फायदा व मुख्याधिकाऱ्यांच्या खास व्यक्तीला होत आहे.हा निविदा त्वरित रद्द करण्यात यावा व मागील वर्षीप्रमाणे निविदा काढण्यात यावा ज्यामुळे नगर परिषदच्या फायदा होईल असे ऍड मेघा भाले यांनी मागणी केली आहे.