परिसरात आज सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आणि दुपार होताच आभाळ मोकळे झाले त्यामुळे नाल्याला पाणी आले होते यावेळी शेतातून परत येताना स्मशान भूमी लगत असलेल्या नाल्यावर पाय घसरून आवाळपूर येथील शेतमजूर मनोज महादेव आत्राम वय ३४ वर्ष हा नाल्यात वाहून गेला ही घटना साधारणतः ३.३० वाजता घडली.
युवक वाहून गेला याची माहिती हवेसारखी पसरली आणि नाल्यावर लोकांची तोबा गर्दी झाली. गावातील नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने स्वतः पाण्यात उतरत शोधा - शोध सुरू केली. काही अंतरावर ६.३० वाजता मुसळे यांचा शेता लगत त्यांचा मृतदेह आढळला. मनोज यांचा पाठीमागे २ मुले पत्नी, असा आप्तपरिवार असल्याने त्याचा जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.मात्र गडचांदूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात जीवाची पर्वा न करता मृतकाचे सव शोधून काधल्याने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे शोधकार्य वेळी सहायक उपनिरीक्षक प्रमोद शिंदे याचे पायाला सुद्धा दुखापत झाल्याचे समजते यावेळी फौजदार इंदर राठोड व इतर कर्मचारी समवेत ठाणेदार सिंदे उपस्थित होते.