खबरकट्टा/चंद्रपूर:
बल्लारपूर - सतत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला त्याच परिसरातील 5 जणांनी मिळून त्याची हत्या केली, ही थरारक घटना 14 जुन ला रात्री दीड ते 2 वाजताच्या सुमारास मौलाना आझाद वार्डात घडली.
बल्लारपूर शहरातील रवींद्र वार्ड, कारवा रोड येथे राहणारा 28 वर्षीय दीपक कैथवास या युवकाची 5 जणांनी मिळून हत्या केली, हत्येनंतर 5 जणांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये जात सरेंडर केले.#khabarkatta chandrapur
हत्येचं कारण काय?
दीपक कैथवास याच्यावर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहे, तो नेहमी कुणासोबतही वाद घालत होता, त्यामुळे परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती.#khabarkatta chandrapur
दीपक हा परिसरातील नागरिकांना सुद्धा त्रास द्यायचा, आरोपी युवकांवर सुद्धा दीपक ने अनेकदा वाद घालत त्यांना मारहाण केली होती, त्या मारहाणीचा बदला व त्याची निर्माण झालेली दहशत संपविण्यासाठी रात्रीच्या सुमारास दीपक ला त्या युवकांनी गाठले, रोड दंडे याच्याने दिपकवर जोरदार प्रहार करण्यात आले होते.
त्या मारहाणीत दीपक चा मृत्यू झाला, आरोपी हे 18 वर्षे वयाची असल्याची माहिती आहे, घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.#khabarkatta chandrapur