खबरकट्टा/चंद्रपूर:
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट- गाईड विभाग व ईतर विध्यार्थीच्या सहकार्याने विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली "जय जय महाराष्ट्र माझा " असे शब्द लेखन करून शिवजयंतीच्या पूर्वदिवसाला राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
यापूर्वी देखील आदर्श शाळेतील विध्यार्थीनी विध्यार्थी साखळी च्या माध्यमातून राष्ट्रीय हरीत सेना, सेव ट्री, सेव टायगर, जागतिक एड्स दिन चिन्ह, इंडिया -75, संविधान, सकाळ स्वाथ्यम, भारताचा नकाशा, दीपोत्सव, विविध चिन्ह, असे विविध शब्द लेखन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. विध्यार्थी साखळी आणी शब्दलेखन या माध्यमातून अनेकदा विध्यार्थीनी जनजागृती केली.
या विध्यार्थी साखळी निर्मिती बद्दल बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्कर येसेकर, सहसचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक मधुकर जाणवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर आदींनी अभिनंदन व कौतुक केले. तर या विध्यार्थी साखळी करिता सहायक शिक्षक रुपेश चिडे, विकास बावणे, शिक्षिका जयश्री धोटे, ज्योती कल्लूरवार, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, रोशनी कांबळे, अर्चना मारोटकर, वैशाली चिमूरकर, सातपुते आदीसह सर्व शिक्षक शिक्षिका व विध्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.