पाहमी येथील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्या :#sachin-rajurkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पाहमी येथील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्या :#sachin-rajurkar

Share This

सचिन राजुरकर शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


जमिन महसूल प्रशासनाची असतांना वनविभागाकडून अतिक्रमण हटविण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार त्रास

खबरकट्टा /चंद्रपूर:


चंद्रपूर जिल्ह्यातील पाहणी येथील शेतकरी मागील ४० वर्षांपासून पट्ट्याची शेती करीत आहे. शेतकºयांनी वनपट्ट्याची जमीन समजून कायमस्वरूपी पट्टे मिळावे यासाठी अर्ज केला असता, सदस्य सचिव वनहक्क समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांने सदर जमीन महसूल विभागाची असून वनजमिन नसल्यामुळे दावा फेटाळण्यात आला होता. या जमिनीवर वनविभागाचा कोणताही हक्क नसतांना ताडोबा बफर उपसंचालक कार्यालयाकडून शेती करीत असलेल्या शेतकऱ्यांना वारंवार त्रास देवून अतिक्रमणे हटविण्याबाबत त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी वनपट्टे मंजूर करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. पाहणी येथील शेतकरी विजय शेडमाके ,रामदास आत्राम, मनोज सोयाम, सुरेश आत्राम, देवराव कोडापे, भिमराव कोडापे व इतर शेतकरी मागील ४० वर्षांपासून पट्ट्याची शेती करीत आहे. या सर्व शेतकºयांना वनपट्टा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव वनहक्क समिती यांच्याकडे अर्ज केला होता.


जिल्हाधिकारी यांनी सदर जागा ही महसूल प्रशासनाची असल्यामुळे वनपट्टा मंजूर करता येत नसल्याचे उत्तरात सांगितले. दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उपसंचालक बफर कार्यालयाकडून सदर शेतकºयांना वारंवार त्रास देवून अतिक्रमण हटविण्याबाबत सांगण्यात येत आहे. सदर जमिनीवर वनविभागाचा कोणताही अधिकार नसतांना शेतकºयांना वारंवार वनविभागाकडून त्रास देण्यात येत आहे. यामुळे सदर शेतकºयांना कायमस्वरूपी पट्टा मंजूर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, आदिवाासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष कृष्णा मसराम व शेतकºयांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Pages