एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नागपूर विभागाचा पाठींबा.:#rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नागपूर विभागाचा पाठींबा.:#rajura

Share This


राजुरा आगार व्यवस्थापका मार्फत दिले पाठींब्याचे पत्र.

मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविले निवेदन.

खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा


महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ राजुरा येथील कर्मचाऱ्यांचा संप गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. दिवाळीच्या दिवशी घरी न जाता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ राजुरा डेपो समोर आपल्या आप्तस्विकियासोबत, परिवारा सोबत दिवाळी साजरी करण्यात आली. हा संप संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असून राजुरा एस. टी. कर्मचारी करीत असलेल्या डेपो समोरील आंदोलनस्थळी जाऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष बादल बेले यांनी खंबीर पाठिंबा दिला आहे.


महाराष्ट्र राज्यात राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. हे सत्र अजूनही सुरू असून आणखी किती कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय्य मागण्या करिता जीव गमवावा लागणार आहे त्यामुळे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्या करिता लोकशाही मार्गाने अतिशय शांतपणे सुरू असलेल्या या संपाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नागपूर विभागाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या त्वरित मान्य करून या संपाला पूर्णविराम द्यावा तसेच या संपात सहभागी कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये याकरिता राजुरा आगार व्यवस्थापक यांच्या मार्फत विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले. तसेच या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, परिवहन मंत्री तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली.


यावेळी राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, रजनी शर्मा, आशिष करमरकर, नितीन जयपुरकर, मनोज तेलीवार, बबलू चव्हाण, अमर पचारे, किरण हेडाऊ, संदीप आदे, मोहन मेश्राम, सुनैना तांबेकर, आकाश वाटेकर, उमेश लढी, गौरव कोडापे, नागेश उरकुडे आदींसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. संपस्थळी असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांचे म्हणणे विचारात घेऊन त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण कारण्याकरिता नेफडो संस्था प्रामानिकपणे प्रयत्न करेल अशी गवाही यावेळी देण्यात आली.




Pages