ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणा-या दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना सोमवारी मुख्य वनरक्षकाच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे.शासकीय कामाचा अनुभव नसून कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागण्याचा ठपका शहा ठेवण्यात आला असून , या कारवाईमुळे वनविभागात चांगलीच खळबळ माजली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट च्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभाग अलर्ट झाला आहे.
वरिष्ठ वनाधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घ्यायला लागले असून दक्षिण वनक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी लक्ष्मी शहा यांच्याकडूनही कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देऊन दमदाटी केली जात होती. मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू होते. शासकीय कामा मध्ये लागणारे साहित्य खरेदी न करता काम करण्यासाठी त्रास देणे पाळीव प्राण्यांच्या नुसकान प्रकरणांमध्ये धमकी देऊन बनावट गॅस तयार करण्यासाठी त्रास देणे, कर्मचाऱ्यांचे सी आर खराब करण्याची धमकी देणे, गावातील प्रतिष्ठित नागरिक अशी संपर्क न करता कोणतीही सभा न आयोजित केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला .
दरम्यान 15 मे रोजी एकारा येथील विश्रामगृहावर वरिष्ठ वनधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. दक्षिण ब्रह्मपुरी वन शेत्र मागील तीन वर्षात एकुण ०६ मृत्यू तर १७ जण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाली आहे.
वन वणव्याच्या घटना ही मोठ्या प्रमाणात घडलेल्या असुन वनसंपदेचे नुस्कान झाले आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या शासकीय कामामध्ये तत्पर राहत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून महाराष्ट्र नागरी (शिस्त व अपिल ) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (एक) अन्वये मुख्य वनरक्षकांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवारी दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी लक्ष्मी शह यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत शहा यांना मध्य चांदा वन विभागाचे उपवन रक्षक पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

