ब्रम्हपूरी तालुक्यातील दक्षिण परिक्षेत्रातील जंगलव्याप्त भागातील चिचगाव गावातील एका महिलेला गावालगत दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
ब्रम्हपूरी तालुक्यातील नेहमीच वन्यजीव प्राणी व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तीन दिवसांपूर्वी एका महिलेला ठार केले.आज पुन्हा एका महिलेचा बळी गेला.जंगलव्याप्त भागातील नागरिकांनी यापुर्वी अनेक आंदोलनं करण्यात आले.पण वनविभाग ने अजुनही कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
आज ठार झालेल्या महिलेचे नाव सायत्रा श्रीराम ठेंगरी वय ६०असे असुन नेहमी प्रमाणे सायंकाळी चुल पेटविण्यासाठी काड्या घरामागे गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला व नरडीचा घोट घेऊन जागीच ठार केले.व काही अंतरावर नेले सदर घटने मुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण व वनविभागा प्रती रोष निर्माण झाले आहे.सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.बातमी लिहेपर्यंत घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहोचले नव्हते..
