आज दिनांक 20नोव्हेंबर 2020 ला राजुरा गोविंदपूर महामार्ग गडचांदूर शहरा लगत जीवघेणे खडे होते, हे खडे काही युवकांनी मिळून हे खड्डे बुजविले, येत्या काही दिवसापासून हे खड्डे जीवघेणे बनले त्या मुळे ये जा करणाऱ्या प्रवासीना मोठी कसरत करावी लागत होती.
ही कसरत करताना कित्येक लोक या खड्ड्यात पडले, व काही लोकांना आपला जीव पण गमवावा लागला , या ठिकाणी मोठया प्रमाणात रहदारी असते व मोठया सिमेंट कंपनीत चालणाऱ्या ओव्हर लोड असलेल्या ट्रक या मुळे या रस्त्याचे बारा वाजले आहे.
जिल्हातील अत्यंत वर्दळीच्या महामार्गपैकी एक असलेला महामार्ग आहे या रस्त्याची प्रचंड दूर अवस्था झाली आहे या मुळे स्थानिक लोकांना व शेती मध्ये जाणाऱ्या आणि प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ,रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशे चित्र दिसत आहे.
मात्र, बांधकाम विभागाला कुंभकारणाची झोप लागली आहे व स्थानिक प्रतिनिधी बांधकाम विभागाला उठवता येत नाही आहे , याची मोठी खंत व्यक करत नाराजगी व्यक्त करीत असताना ,कोरपना तालुक्यातील गडचांदूर मधील ध्येय वेड्या युवकांनी या महामार्ग वरील आपल्या श्रमदानातून खड्डे बुजविले.
या मध्ये हे श्रम दान करताना , अतुल गोरे , मयूर एकरे ,तुकाराम चिकटे,अनिकेत दैवलकर,राजू झाडे , शेख बाबर , झाकीर शेख, उद्देश भोंगळे , यांनी मिळून हे श्रमदानातून खडे बुजविले, पण हे काम बांधकाम विभागाचे आहे. येणाऱ्या काळात हा रस्ता नीटनेटका झाला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा या युवकानी केला आणि लवकर तातडीने काम व्हावं मागणी केली.