खबरकट्टा/चंद्रपूर:
वाघ, बिबट आणि वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता जंगलात वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. मागील तीन-चार महिन्यांमध्ये वन्य प्राण्यांच्या झुंजी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, यामध्ये वन्य प्राण्यांचे जीव जाऊ लागले आहेत. आज मंगळवारी सिंदेवाही तालुक्यातील पाथरी रोडवर असलेल्या तांबेगडी मेठाजवळ एका वाघाने बिबट्याशी झुंज केली आणि त्यात बिबट्याला ठार केले.
रोडावर पट्टेदार वाघाच्या झुंजीत बिबट ठार झाला वनपरिक्षेत्र प्रादेशिक अंतर्गत येत असलेल्या उपवनपरीक्षेत्र तांबेगळी मेंठा मधील मरेगाव तुकम्म खैरी पासून एक किलोमीटर अंतरावर रोडवर आज मंगळवारला सकाळी वाघाच्या झुंजीत बिबट ठार झाल्याची घटना घडली आहे 1. घटनेची माहिती मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी व टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास चालू आहे.