बळीराज धोटे सहीत पत्रकार परिषद घेणाऱ्यांवार 5 कोटींचा मानहानी दावा
तर गैरव्यावहाराची लढाई लढण्याकरिता नवे बळ मिळाल्याची धोटे यांची प्रतिक्रिया
खबरकट्टा / चंद्रपूर :
12 नोव्हेम्बरला चंद्रपुरातील औष्णिक विदुयत केंद्रात प्रकल्पग्रस्तांना डावलून जे प्रकल्पग्रस्त नाही त्यांना एका रॅकेटच्या साहाय्याने प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्याचे काम सुरू आहे असा थेट आरोप बळीराज धोटे यांनी आस्थापना विभागात कार्यरत अरविंद धोटे व लिपिक वासुदेव कुरेकार यांच्यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लावण्यात आला.
सदर बातमी प्रकाशित होतांच चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रात एकच खळबळ उडाली होती, धोटे यांनी आपल्या आरोपात एकाच परिवारातील 3 ते 4 सदस्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करून निवड करण्यात येत होती, विशेष म्हणजे जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये जे प्रकल्पग्रस्त नाही त्यांची सुद्धा नावे होती.
हे सर्व गौडबंगाल वानखेडे व कुरेकार यांच्या सहभागाने होत असल्याचे वक्तव्य धोटे यांनी केले होते.
खोटे कागदपत्र बनवून लाखो रुपये वसूल करीत हे सर्व रॅकेट सक्रिय असल्याचा दावा धोटे यांनी केला होता.या सर्व आरोपावर वानखेडे व कुरेकार यांनी पत्रकार परिषद घेणारे बळीराज धोटे, गुलाब जीवतोडे, भास्कर सपाट, दिलीप उपरे व आत्माराम देवतळे यांच्यावर 5 कोटी रुपयांचा मानहानी दावा न्यायालयात दाखल केला. याबाबत 16 नोव्हेम्बरला नोटीसही जारी करण्यात आले, सदर गैरव्यवहाराची बातमी वर्तमानपत्र, सोशल मीडियावर प्रकाशित झाली होती.
मानहानी दाव्याचे बळीराज धोटे यांनी स्वागत करीत आता ही गैरव्यवहाराची लढाई लढण्यासाठी आम्हाला नवं बळ मिळाले असून
न्यायालयात आम्ही आमची बाजू ठामपणे मांडू शकतो असे वक्तव्य करीत, या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता महाजेनको येथून त्रिसदस्यीय समिती 2 व 3 डिसेंम्बरला चंद्रपुरात येत आहे, त्यासमोरही आम्ही प्रकल्प ग्रस्तांची होत असलेली फसवणूक व त्यांच्याजवळून घेतलेले पैसे याचे सर्व पुरावे समितीसमोर सादर करणार असल्याचे धोटे यांनी यावेळी सांगितले.