शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र व माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पत्र लिहिलं आहे. 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला जावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिवस म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. 19 जूनला ज्याप्रमाणे जागतिक योग दिवस साजरा केला जातो तसाच 21जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करावं असं या पत्रात म्हटलं आहे.40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे राहिले आणि सरकार पडलं
2022 साली विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकरालं होतं. त्यानंतर एक एक करत 40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे राहिले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर 30 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
राऊत पत्रात म्हणतात, बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला
“20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून पाळला जावा अशी मागणी करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचं प्रतिनिधित्व करतो. मी भारताच्या वरीष्ठ सभागृहाचा सदस्य आहे. माझा पक्ष हा पश्चिम भारतामधील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी स्थानिक मुंबईकरांच्या हक्कांसाठी सुरु केला. माझ्या पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. ते 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 दरम्यान मुख्यमंत्री होते,” असा उल्लेख या पत्रात संजय राऊतांनी केला आहे.
पत्रात एकनाथ शिंदेंचा उल्लेख :“20 जून रोजी भारतीय जनता पार्टीने फूस लावल्याने आमच्या पक्षातील 40 आमदारांनी आमची साथ सोडली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने 50 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने हे सारं केलं. आम्हाला सोडून गेलेल्या 40 आमदारांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत असून ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे 10 अपक्ष आमदारही आम्हाला सोडून गेले,” असा घटनाक्रम राऊत यांनी पत्रात सांगितला आहे.
तर् अगदी या सारखेच पत्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहून 21जून हा गद्दार दिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रानुसार...
आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकवेळा आपल्या भेटीगाठी झाल्या, आपण महाराष्ट्रात असताना ज्या पद्धतीने मा. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम अविरत चालू ठेवले होतेच! ते कमी झाले की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ - खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. याची परिणती 20 जून 2022 रोजी शिवसेना पक्षातून 40 आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले. असे म्हणतात ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील 32-33 देशांनी माहिती घेतली.
जर अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस "जागतिक गद्दार दिन" साजरा होवू शकतो, तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत "युनो" कडे प्रयत्न करावे, अशी मी आपणास विनंती करतो.