खबरकट्टा / चंद्रपूर :
राजुरा येथील युवा कवी आदित्य दिनकर आवारी यांना उस्मानाबादेत होणाऱ्या आगामी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२० येथे कविता सादर करण्यासाठी मान मिळालेला आहे.
१०,११ व १२ जानेवारी २०२० ला आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
आदित्य यांच्या "खाणीतला बाप" या कवितेच्या सादरीकरणासाठी निवड झाली आहे,या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे असून स्वागताध्यक्ष नितीन तावडे हे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील जेष्ठ कवींच्या रांगेत आदित्यने स्थान मिळवले आहे, आदित्यचे वय अवघे १७ असल्याने मित्रपरिवार,राजुरा क्षेत्रात आणि महाविद्यालयात आदित्यचे कौतुक केले जात आहे.टीम खबरकट्टा कडून युवकवी आदित्य आवारी यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐